‘‘प्रवासी जोडो अभियान’’
महामंडळ चालू वर्षी प्रवासी जोडो
अभियान सर्व आगार व विभागीय पातळीवर राबवित आहे.
प्रवासी जोडो अभियान राबविण्याचा मुख्या उद्देश हा
महामंडळापासून दूर गेलेला प्रवासी परत आकृष्ट करणे हा
आहे. या अभियानात प्रामुख्याने गाड्यांची स्वच्छता,
नियमितता ठेवणे, गाड्यांच्या रंगसंगतीत व रचनेत बदल
करणे त्याचप्रमाणे प्रवासी हा केंद्रबिंदू मानून
त्यांना सौजन्याची वागणूक देणे इत्यादी उपाय योजना करणे
या बाबी सर्व स्तरावर सातत्याने अमंलात आणल्या जातात.
तसेच प्रामुख्याने वाहक, चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना
संबोधले जाते.